Friday, February 11, 2011

अजनबी....

ख्वाबों में मेरी रोज आता हैं वोह..
आँखों से नींदे उडा ले जाता हैं वोह...
चेहरा तो उसका अंजान हैं फिर भी....
क्यूँ इतना अपनासा लगता हैं वोह?

बहती हवा में भी उसकी आहट होती हैं...
इस दिल को उसकी चाहत होती हैं...
माना की वोह अजनबी हैं फिर भी...
क्यूँ इतना प्यारा सा लगता हैं वोह?

खिलती कलियों में खुशबू उसकी होती है...
इस दिल में पूजा भी उसकी होती हैं...
माना की वोह मुझसे दूर हैं फिर भी...
क्यूँ इतना करीब लगता हैं वोह?







Saturday, October 9, 2010

असे का?

खरच प्रेमात नेहमी असच होत का?

तो समोर नसताना
नेहमी विचारांच वादळ येते माझ्या मनात,
तो दिसला की मात्र
उत्साहाची लहर संचारते माझ्या तनात.

प्रत्येक वेळी डोळे माझे
शोधत असतात फक्त त्याला,
विसरते मी माझी सर्व दु:खे
स्मरून त्याच्या स्मिताला.

नकळतपणे सर्व सुख- दु:खे माझी
जोडली गेली त्याच्या अस्तित्वाशी,
त्याला नाही कलली तरी
अवस्था माझ्या मनाची.

त्याला आनंदात पाहून मग
मीसुद्धा आनंदी रहू लागले,
स्वत:च दुःख विसरून फक्त
त्याच्या सुखासाठी जगू लागले.

खरच प्रेमात नेहमी असच का होते?

Thursday, October 7, 2010

स्पर्श तुझा....

स्पर्श तुझा....
ग्रीष्मातिल पाउस असा

स्पर्श तुझा....
तपता उन्हातील गारवा जसा

स्पर्श तुझा....
पानावरील दवबिंदू असा

स्पर्श तुझा....
मंद सुवासिक मरवा जसा

स्पर्श तुझा....
 जगण्यासाठी आधार असा

स्पर्श तुझा....
निराशेत आशेचा किरण जसा

Saturday, October 2, 2010

फक्त प्रेम!

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आशा गोष्टी घडतात की त्यांचा आपल्याला तेव्हा अणि नंतर सुद्धा खुप त्रास होतो.त्या त्या वेळी आपल्याला योग्य वाटेल ते आपण करत जातो. पण ते योग्य होते की नाही हे पुढे येणारा कालच ठरवतो. त्या गोष्टींमुले आपण स्वतःवर तर रागावतो पण समोरच्या व्यक्तीवरसुद्धा रागावतो.कधी कधी ते नाराज असने इतके वाढते की त्या व्यक्तीच्या प्रत्येक वागण्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो.त्या वागण्याचा त्रास न होण्यासाठी आपण कधी कधी त्या व्यक्तिपासून दूर होण्याचा क्रूर निर्णय घेउन बसतो. त्या व्यक्तिबद्दल मनात अढी ठेवतो. पण असे करने कितपत योग्य आहे?

देवाने आपल्याला इतके सुरेख आयुष्य दिले आहे. एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी फक्त राग, लोभ, द्वेष करत असतो. या मागे फक्त परिस्थिति असते असा नाही. या मागे एक महत्वाच कारन म्हणजे आपला खोटा अभिमान, अहंकार आणि स्वताहाची चुक असताना ती मान्य न करण्याची वृत्ति.या मुले ना आपण कधी सारासार विचार करतो ना विवेकबुद्धीने वागतो.

या सगल्यांवर आपल्याला ताबा ठेवता यायला हवा. तरच आपली विचार करण्याची दिशा योग्य आहे याची खात्री असेल. राग, लोभ, द्वेष यांना थारा उरणार नाही. प्रेमभावना जोपासली जाइल. आपण हे कायम लक्षात ठेवायला हवे की हे आयुष्य खुप छोटे आहे. त्यात आपल्याला प्रेम करायला, नाती जोडायला अणि ती टिकावायालाच कसा बसा वेळ मिलतो तर द्वेष, राग यांसाठी आपल्याला कधी वेळ मिळणार? म्हणून दोस्तहो आयुष्यात फक्त प्रेम करा. आयुष्य खुप सुन्दर होइल.

Saturday, September 11, 2010

बंध...

बंध मनांचे अपुल्या नकळत ऐसे जुलले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

बहरला रुतु वसंत मनी तप्त ग्रीष्मात जणू
मोहरले त्यापरी मनात तव प्रीतीचे इंद्रधनू
वेद्य मनास माझ्या काही न मग सुचले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

ओज़रत्या स्पर्शाने तुझिया शहारले माझे तन
सोबतीला तुझिया रे आसुसले वेडे मन
अबोल डोले मग हे तुजपाशी सर्व वदले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

असता क्षणोक्षणी ममसवे तू सखया
मम जीवन हे बहरले प्रीतीने तुझिया
जीवनी मग या तुजवाचुन काही न उरले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

Friday, August 13, 2010

Beginning a new Journey...

Many times I felt sharing my thoughts. I also thought about writing a blog but did not write. I am a kind of introvert or you can say a good listener.But some how I felt that I should change..
So At last here I am...Hope you guys will be part of this journey...